Posts

Showing posts from 2023

विराटनगरीचे अनमोल रत्न : किल्ले वैराटगड

Image
              आमच्या गावातून सकाळच्या वेळी सूर्य डोक्यावर घेणारा वैराटगड नेहमी लक्ष खेचून घेत होता. पुण्या मुंबईला जाताना त्सरताळे गावात येताच वैराटगड त्याचे ते विशाल बाहू पसरवून बोलावू लागतो. लहानपणी इतिहासाशी अनभिज्ञ असल्याने वैराटगडावर जाऊन सुद्धा त्याचा पूर्ण परिचय झाल्यासारखं वाटत नव्हते. सरनौबत नरवीर पिलाजी गोळे प्रतिष्ठान च्या माध्यमातून पुन्हा एकदा वैराटगड चे दर्शन मिळण्याचा योग जुळला!             गडकोट मोहिमांमधून प्रतिष्ठान तर्फे रविवार ३० एप्रिल २०२३ ही तारीख वैराटगड मोहिमेसाठी फिक्स करण्यात आली. आणि शेवटी तो दिवस उजडलाच! आमचे बंधू प्रशांत दादा, राहुल दादा, मार्गदर्शक आणि कोणत्याही मोहिमेस नाही न म्हणणारे देविदास दादा आणि त्यांचा परिवार, सदैव साथ देणारे जालिंदर दादा आणि माजी बहीण गौरी असे १० १२ सरनौबत गोळे आम्ही हर हर महादेव बोलत गडाकडे सकाळी सकाळी प्रस्थान केले. इतिहास               शिलाहार राजा भोजने हा गड ११७८ ते ९३ या काळात बांधला. प्राचीन वैराट ऊर्फ विराटनगरी म्हणजेच आजच्य...

वाईचा पाठीराखा: पांडवगड

Image
वाईच्या वायव्येस (वाई ता. १७' ५५' उ., ७३' ५०" पू. उंची १,२७३ मीटर) ६ कि. मी. अंतरावर  वर आपल्या बलाढ्य नैसर्गिक रचनेने लक्ष वेधून घेतो तो विराटनगरीचा पाठीराखा पांडवगड ! चौरस माथा असलेला या गडाच्या सौन्दर्यावर मोहून इकडे पावले ओढ घेत असतात. या गडाला पांडुगड असेही बोलले जाते. इतिहास कोल्हापूरचे शिलाहार राजा दुसरा भोज याने सातारा जिल्यात जे काही दुर्ग निर्माण केले त्यापैकी पांडवगड हा एक! याची निर्मिती ११७८ ते ११९३ या कालखंडात केली असावी. [सातारा गॅझेटिअर, १८८५, पृ. ५३५.] स्थानिक लोकांच्या मते पांडव अज्ञातवासात असताना इथे राहिले होते आणि त्यावरूनच याचे नाव पांडवगड पडले.  परंतु याला इतिहास-संशोधकांची मान्यता नाही, कारण पांडव या भागात आलेलेच नव्हते. 'वाई ही महाभारत काळात विराटनगरी होती व पांडव अज्ञातवासात इथे पांडवगडावर राहिले'  समजूतीला इतिहास तज्ञांना कोणताही पुरावा मिळालेला नाही. सन १६४८ मध्ये हा वाईच्या विजापूर दरबारच्या मोकासदाराच्या ताब्यात होता.  १२ ऑक्टोबर १६७३ रोजी व पांडवगड किल्ल्यावर मराठा फौजेने हल्ला चढवला. आणि १३ ऑक्टोबर रोजी मराठ्यांनी पांडवगड जिंकला य...